प्रेरणादायी विचार मराठी Success Marathi Suvichar

आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar | Life Suvichar Marathi | Marathi Suvichar Images | मराठी सुविचार आयुष्याबद्दल

प्रेरणादायी सुविचार आपल्या जीवनात मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आणि संघर्षांच्या संवेदनशील क्षणांमध्ये ते मार्गदर्शन करीत असतात. प्रेरणादायक सुविचार आपल्याला उत्साहित करतात. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रेरित करतात. प्रेरणा संदेशांनी आपल्या जीवनात उत्साह जागृत केला जातो. प्रेरणादायी सुविचारमुळे आपल्याला आपल्या जीवनातील ध्येयं ओळख करण्यात मदत होते. (Inspirational Marathi Suvichar).

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

प्रेरणादायी सुविचारांचा आपल्या भावनांवर खोल प्रभाव पडत असतो. त्यांच्यात आपले मनोबल वाढवण्याची, आपला आत्मविश्वास वाढवण्याची आणि सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची क्षमता आहे. कठीण काळात, हे सुविचार सांत्वनाचे स्त्रोत म्हणून काम करतात, तुम्हाला शक्ती आणि लवचिकता परत मिळविण्यात मदत करतात. अनेक प्रेरणादायी कोट्स अशा व्यक्तींकडून येतात ज्यांनी त्यांच्या जीवनात आव्हाने अनुभवली आहेत किंवा उल्लेखनीय यश मिळवले आहे. हे कोट्स किंवा सुविचार त्यांच्या शहाणपणाची आणि अनुभवाची झलक देतात, ज्यामुळे आम्हाला त्यांच्या धड्यांमधून शिकता येते आणि ते स्वतःच्या जीवनात लागू होते. आपल्या जीवनात सकारात्मक बदलासाठी प्रेरणादायी सुविचार नेहमी उपयोगी पडतात. (Success Marathi Suvichar).

खालीलप्रमाणे दिलेले प्रेरणादायी विचार तुम्हाला नक्कीच आवडतील.

Life प्रेरणादायक सुविचार



फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग पैसा असो की माणसं.

 

शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते.


गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधतांना संपूर्ण आयुष्य निघून जात.


कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात.


स्वप्न मोफतच असतात , फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

संधी आणि सुर्योदय दोन्हीत एक साम्य आहे, उशीरा जागे होणा-याच्या नशीबी दोन्ही नसतात.


स्वत:च्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा कि, चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहीजे.


व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला न  शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य.


संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी.. जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.


पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो.


स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.


विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते.


खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते.


ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पहाण्याची ती सुरुवात असते.


तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते, हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही होत नाही.


प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.


कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते. जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही.


सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द.


अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो.


गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारीक शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्कानी नाही.


अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

काही माणसं लाखात एक असतात, आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात.


दु:खाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.


आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलतां आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही.


पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणार रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जात. शत्रुच अस्तित्व कितीही मोठ का असे ना पण; आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याच अस्तित्व लहान ठरते.


अपेक्षा आणी स्वार्थ या विचित्र खेळात  माणुस एकदा अडकला, की तो स्वतःच सत्व, तत्व, नाती, गोती एवढच काय माणुसपणही विसरून जातो.


लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं. पण हे खरं नाही. कारण नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचे असेल तरच टिकतं.


'नशिबात आणि नजरेत' एकच फरक आहे… जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते.


शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल


परस्थितीच्या हातातील कठ पुतळी कधीच होऊ नका कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकत आहे.


काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते, दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते.


आपले दुख:किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,कारन हे कलियुग आहे इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो.


माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.


जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी.


विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी  शस्र आहे.


ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून रहात नाही पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते.


धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात.


संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान.


लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजु शकत नाही कारण लिहीणारी व्यक्ती भावना लिहीते आणि वाचणारी व्यक्ती फक्त शब्द वाचते.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

ज्यांना अपयशाची भीती वाटते तेच अपयशी ठरतात ज्यांना अपयशाची भीती वाटत नाही यश त्यांची वाट पाहत उभं असतं.


जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे.


भावना ह्या शब्दांपेक्षा नजरेला जास्त स्पष्ट कळतात, फक्त वाचवण्याची कला आपल्याला अवगत पाहिजे.


आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळं आपलचं होत गेलं असतं, तर "गमवायची भीती" अन "मिळवायची किंमत" कधीच समजली नसती.


काही वाक्य चेहर्‍यावर वाचता येतात त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते.


आपल्या सुखाचं क्षितीज इतरांचा नजरेत भले ही सीमीत असेल पण स्व:ताचा नजरेत त्याला सिमा नसली पाहिजे.


माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांच्यातही कॅरेटचा फरक असतोच.


समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते. जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते पण जे ती हाताळतात त्यांनाच तिचे खरे वास्तव कळते.


आपलां व्यक्तिमत्त्व हे समईच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत, सात्विक ! प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा! धीर देणारा..


डोळे जगातली प्रत्येक वस्तू बघू शकतात. परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे  माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो. परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही.


छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती उध्वस्त होतात.


आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे रोजच स्तुती होत राहीली तर आयुष्यात प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्वीष्टीचा मार्ग सुरु होतो.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

पैशाने विकत घेत येत नाही अशी एखादीतरी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका.


चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.


आत्मविश्वास सुविचार मराठी


कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका.


प्रेम व आनंद देणार्‍या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.


तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.


जीवनात चूका, अपयश आणि नकार हा एका अर्थी प्रगतीचाच भाग असतो, आणी जो यांना सामोरे जात नाही तो यशस्वी होऊ शकत नाही.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

वाद फक्त माझंच योग्य आहे हे सांगण्यासाठी असतो. संवाद काय योग्य आहे ?  हे शोधण्यासाठी असतो.


आपली प्रतिष्ठा सांभाळणे महत्वाचे आहे कारण हीच एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते.


संकटांचे आभाळ ज्या अर्थी इतके भरुन आले आहे त्या अर्थी सुखाचा श्रावण ही अगदी जवळपास असणार अशा आशेवर जगणे हेच जीवन.


ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चुक म्हणण्याची हिम्मत ठेवतात.


स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही.


भूतलावर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे, जो आपले विष आणि गोडी त्याच्या दातांमधून नव्हे परंतु जिभेद्वारे बाहेर टाकू शकतो.


प्रत्येक बदलत्या वर्षात जुनी माणसं आपल्या सोबत असणं ही आयुष्याची मिळकत असते.


प्रत्येक लहान गोष्टी मध्ये केलेली सुधारणा मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.


अनुभव हा महान शिक्षक आहे,पण तो मोबदला मात्र फार घेतो.


माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसतं, ते शोधण्यातच त्याचे पुर्ण आयुष्य संपतं ते म्हणजे समाधान.


छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो
तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी
तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन
आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा.


नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी येते. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.


सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर.


कुणाला न दुखवता जगणे यांच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही.


माणसं ओळखायची आणि पारखायची असतील तर त्यांच्या मानविरुद्ध एकदा वागुन बघा तुम्हाला तुमची जागा समजेल.


जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.


उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या,तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते.


आयुष्यात जे शिकुन घेता येईल ते शिकुन घ्या कोणतीच संधी वाया घालवू नका कारण आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही.


आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चाललं पण प्रेमाची माणसंअशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही.


जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं.


माणसाला माणसांजवळ आणणे हीच खरी समाज सेवा हिच खरी प्रगती आणि माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म.


माणसानं पावसा सारख बरसाव, पाण्यासारख निर्मळ असावं, जिथं जाव तिथं तृप्तता,समृद्धता आणि आनंद देत व घेत रहावं.


अक्षरांच्या ओळखी सारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात; आणि वाचली तर अधिक समजतात.


संघर्षाला कधीही दुर्दैव मानून पळ काढू नये. संघर्षास सामोरं जाणा-याला हमखास यश मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हा मुद्दा नसतो तर बेतलेल्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो, हे महत्त्वाचं असतं.


जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की अपोआप सुटतात.


प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात.


कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्ही कडे उजेड पडतो.


ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी जीवनातील  अनेक गैरसमज दुर होतील.


शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.


सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं.


वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्यात पण संवाद तुटला नाही पाहिजे कारण संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते.


कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो.


सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी.


ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात  पडते.


प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो त्यापासून सावध रहा.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटाना दुर ठेवायला मदत करते.


जीवनात यशस्वी होण्या साठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक "निंदक" आणि दुसरा "स्पर्धक" कारण दोन्ही व्यक्ती माणसात "जिद्द" निर्माण करत असतात.


आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.


ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही,स्वतःवर विश्वास असला की,जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.


आयुष्यात स्वतःशीच स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनवणं ही आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या आहे.


एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो.


प्रेम आणि मैत्री अशीे दोनच नाती आहेत की त्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळलें की मैत्री होते आणि कोणी मनांत शिरलें की प्रेम होते.


कुणालाही न दुखावता जगणे  याच्या इतके  सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही ज्याला हे कळले त्याला पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही.


एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती.


कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खुप विचारपुर्वक करा कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.


दुख: आणी त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथे तुमच्या  क्षमतेची आणी आत्मविश्वासाची  परीक्षा घेतली जाते.


जगणं  ठाऊक असणाऱ्यांना,  ‎वागणं  कसं असावं हा  प्रश्न  कधीच पडत नाही. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहित असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा मनापासून  विचार करतात.


साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.


खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते.


लोक सहज म्हणतात कोणी कोणाचे नाही पण स्वतःला विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत.


जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात.


माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्विकारावाच लागतो.


प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये. नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.


जगाजवळ किती आहे यापेक्षा स्वतः हा जवळ काय आहे यातचं माणसाचं समाधान दडलेलं असतं.


कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे.


भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असतांना आपण मात्र तळहाताच्या रेषांमध्ये बघत असतो.


आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे.


शरीरात कोणती ही सुंदरता नाही. तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ति आहे.

 

suvichar marathi । आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी विचार मराठी | life प्रेरणादायक सुविचार | Success Marathi Suvichar | Inspirational Marathi Suvichar  । पॉझिटिव्ह सुविचार । life suvichar marathi । marathi suvichar images । मराठी सुविचार आयुष्याबद्दल


अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान, आणि वैर भावना, माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही.


लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळुन आणि जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जिवन सुखी होईल.


मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं, असं लहानपणी वाटायचं, पण खर तर आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य आपण जगतो, कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं.


जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,“लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”


संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण असते. जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असले की हजारो  तलवारींचे युद्ध सुद्धा एका वाघनखांवर जिंकता येतं.


सूर्य आणि बाप या दोघांची गर्मी सहन करायला शिकायला पाहिजे, कारण ह्या दोन्ही मावळल्या की चारही बाजूला अंधार पसरतो.


ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत.. तो तोडताना दहा वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो मग ती झाडे असोत की नाती.


सुख हे  उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात निघून जावं.


सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे. तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका.


वयाने आणि शरीराने आपण आपोआप मोठे होत जातो पण जोवर आयुष्यात अडचणी, अपयश  भेटत नाही. तोवर आपण हुशार, चतुर व समजदार होत नाही.


नुसती कुस बदलुन कधीच दुःख हलकी होत नाहीत त्यासाठी वेदना झटकून उठावं लागतं, अन सुखाच्या स्वागतासाठी प्रयत्न करावे लागतात, तेही अगदी दम लागेपर्यंत कारण दुःखाला पळवून लावलं तरच सुख आपल्या घराचा उंबरा ओलांडतो.


कडू गोळी चावली नाही तर ती  गिळली जाते, त्याप्रमाणे जीवनात अपमान, अपयश, धोका, यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसाल, आठवत राहल, तर जीवन आणखी कडू होईल.


चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नये कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा त्यांच्यावर घाव घातला जातो तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निसटून शांतपणे आपल्या आयुष्यातून निघून जातात.


सर्वात महाग "जागा" कोणती ? जी आपण दुसर्याच्या "मनात" निर्माण करतो ती महाग जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं.


आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत नाही पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.


रस्त्यावर वेगाची मर्यादा असते. बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते. परीक्षेत वेळेची मर्यादा असते. परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक  विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.


दुस-यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो, परंतु दुस-यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो,एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते.


पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं. आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं.


जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं  राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही तर स्वतःच्या समाधानासाठी "आनंदाने" जगणे म्हणजे आयुष्य.


शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते.


फुले नित्य फुलतात. ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.


गैरसमज व्हायला वेळ अजिबात लागतं नाही, तो हा गैरसमज आहे हे समजायला खरा वेळ लागतो आणि तो गैरसमज दूर व्हायला खुप वेळ लागतो.


मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात.


नाती टिकवण्यासाठी आवश्यकता असते झुळझूळ वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्यासारख्या स्वच्छ मनाची आणि त्याच बरोबर अतूट विश्वासाची.


यशाला शॉर्टकट नसतो, कष्ट करावंच लागेल, आणि एकदा यशाची वाट सुरु झाली कि त्याला युटर्न सुध्दा नसतो.


दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी, तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.


उंचावरून सारं जग दिसतं पण जमिनीवर राहून ते कळते आणि काय काय समजून घ्यायचंय हे समजण्यासाठी विचारांची उंची गाठावीच लागते.


कपाट आणि मन वेळोवेळी साफ केले पाहिजे, कारण कपाटात अडचण होते सामानाची आणि मनाला अडचण होते गैरसमजाची.


प्रत्येकाच्या अंगी एक ताकद आणि एक कमजोरी हि असतेच .कारण मासा जंगलात पळू शकत नाही .आणि वाघ पाण्यात आपलं साम्राज्य तयार करू शकत नाही.


ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे.


कधीच कोणावर अवलंबून राहू नका, जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो.


संघर्षाचा  काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुध्दा ओळख  देतात.


जमणार नाही असा विचार करत बसण्यापेक्षा करुन तर बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच जीवनात यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं.


शब्द हे चावी सारखे असतात, जर त्यांची योग्य निवड केली तर ते कोणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात, आणि कोणाचेही तोंड बंद करू शकतात.


कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चुकवत यश आपल्या दारी येतं.


आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते, जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.


स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते.


आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.


चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.


माणूस तेव्हाच अस्वस्थ होतो जेव्हा त्याचा आतला आवाज आणि बाह्य वागणूक यांचा ताळमेळ जुळवू शकत नाही.


आठवणी सांभाळणे सोप्प असत, कारण मनात त्या जपून ठेवता येतात, पण क्षण सांभाळणे फार अवघड असत, कारण क्षणांच्या आठवणी होतात.


भावनांचा अन वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात.


जिवनात पुढे जायचे असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणस सोडली तर बाकीचे मनोबळ दुबळे करणारेच असतात.


जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात.


संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही.


दुसऱ्यांच्या नजरेनं सुख पाहणारी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाहीत, त्यांना नेहमी कोणत्या तरी गोष्टीची कमतरता जाणवतेच.


जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात.


स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान ज्याची कशातच किंमत होऊ शकत नाही जगातील प्रत्येक घराला मुलगी आणि सून यांच्याशिवाय शोभा येऊ शकत नाही.


आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतो एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो.


आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्ती बरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खुप काही शिकायला मिळते.


थोडे लपून स्वतःसाठी जगा, कारण जबाबदारी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही थकल्यावर थोडी विश्रांती घ्या.


प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल, म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं.


कधी कधी तुम्हाला तुमची चांगली बातमी स्वतःकडेच ठेवावी लागते. कारण प्रत्येक जण तुमच्यासाठी खरोखर आनंदी होत नाही.


माणसांचे स्वभाव आपण बदलवू शकत नाही. पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो.


अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगले होईल.


मागे मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळतं तिथे थांबायचं असतं, ध्यानीमनी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं.


माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच 'भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवट पर्यंत टिकते.


आयुष्य कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं वाटेतील खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं.


एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही.


संवाद कमी होऊ लागला की नात भरकटायला लागत आणि हवं असलेलं नातंही संपुष्टात येत त्यामुळे जसा वेळ मिळेल भेटत जा बोलत जा.


मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही घर छोटं असले तरी चालेल पण मन माञ मोठ असल पाहिजे.


मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजात ही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात, आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात.


शोध घ्याल तरच मार्ग सापडेल, मार्ग कधीच तुमचा शोध घेत येत नाही.


फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तुत्व दरवळते त्याला कोणी विझवु शकत नाही.


दुःख इमानदार असतें, थेट काळजात शिरते आणि दीर्घकाळ सोबत राहतं. सुखं वाफेसारखं असतें, घडीभर रेंगाळत आणि बघता बघता उडून जातं.


मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो, कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.


अगरबत्तीचा सुगंधही त्याचवेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देते.


कोटयवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि माणसं कमवावी लागते.


आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारणं काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी, विचार करायला लावतात हे मात्र नक्की.


कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही, हे पाहून समाधानी राहणं म्हणजेचं सुखी जीवन होय.


इतरांचे हृदय जिंकणे हाच जीवनाचा हेतु ठेवा कारण जग जिंकुन सिंकदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता.


आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये; आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली, की उत्तर मनासारखे येते.


अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसे दुर होणार नाहीत, आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत.


एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होवून गाठलेले आभाळ म्हणजे जिद्द.


ॠतू संपल्यावर पडणारा पाऊस हा जसा नकोसा होतो, तसंच गरज संपल्यावर एखाद्या नात्याचं जर ओझं वाटायला लागलं तर याचा अर्थ ते नातं नक्कीच स्वार्थासाठी होतं.


देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहीतात.


माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे. परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.


झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते.


यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते.


राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.


उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपून स्वप्न पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.


गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं, प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असत.


वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं जपलं असतं तर संपल नसतं.


बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येतं. पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धीमान होता येत नाही.


आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधीच जगत नाही तो फक्त गरज आणि इच्छापूर्तीसाठी राबत बसतो.


जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं अस नाही तर, जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काही तरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं.


अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून, समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो.


अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी, चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच, जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.


प्रेम त्याच व्यक्तीवर करावं की जो त्याची चुकी नसताना ही आपल्याकडे माफी मागतो कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नात महत्त्वाचे वाटत असते.


निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही.


स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की, कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही, लोकं आपोआपच कनेक्ट होतं जातात. कारण, प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असण महत्त्वाचं आहे.


प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका, कारण लाेकं सुखांना नजर लावतात आणि दु:खावर मीठ चाेळतात.


माणसाचं मन नुसतं समुद्राएवढे असून चालत नाही,खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी, वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते.


कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याच सामर्थ्य कोणाच्याच नजरेत नसतं.


स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो तिथेच माणुसकीच सुंदर नातं तयार होतं.


माणूस  हा  अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो जेंव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच  माणस  त्याची  साथ सोडतात.


चुकीचा माणूस आपल्याशी कीतीही गोड बोलत असला, तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस कीतीही परखड बोलत असला, तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो.


कमाई चा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान‌, वागणूक आणि संस्कार हे सुध्दा कमाई मधेच मोजले जाते.


समाधान शोधतांना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली, की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चाललीय हे निश्चित समजावे.


तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका. एक प्यादं सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकत फक्त धाडस सोडू नका.


अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणे हि एकच गोष्ट अशी आहे कि त्यासाठी अक्कल लागत नाही.


जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु, स्वतःला आनंदी ठेवा.


आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील.


ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे.


माणसाला माणसांजवळ आणणे, हीच खरी समाज सेवा आणि हिच खरी प्रगती ! आणि माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे, हाच खरा धर्म.


एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते. जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच.


सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षा मध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.


लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागत आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते.


काळा रंग अशुभ समजला जातो; पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो.


जो पर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं, तो पर्यंत शांत राहणंच योग्य असतं, कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं.


घरटं कसं बांधावे हे फक्त निसर्गाकडूनच शिकावं. नाही तर माणूस बांधलेलं घरटं सुद्धा मोडतो.


जेव्हा भावना व्यक्त करायला कागदाची गरज पडते, तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही खूप महत्व येते.


तुमच्या आयुष्यात कुणी सोबत नसेल तर घाबरू नका; कारण एकटे आकाशात उंच उडणारे गरुड फार कमी असतात.


कधी कधी नियती मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवुन द्यायचे असते बघ तुझ्या हक्काचे कोण आहे व परके कोण.


साधी माणसं आणि सरळ रस्ते,  प्रत्येकालाच समजत नाहीत.


आपल्या आयुष्यात अपयश आले तर खचून जाऊ नका, कारण अखंड यशाने फक्त एकच बाजू कळत असते दुसरी बाजू नव्हे.


ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.


चांगली वस्तु, चांगली माणसे, चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत.


पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.


गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम.


आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही, सुविचार पण असावे लागतात, आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.


जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम.


आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.


आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो नाही.


मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.


भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

(प्रेरणादायी विचार मराठी Success Marathi Suvichar).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे Marathi Suvichar for School Students

सुविचार मराठी छोटे Marathi Suvichar Short

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या